शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

सांगली जिल्ह्यासाठी रांजणी येथील जागेचा ‘ड्रायपोर्ट’साठी प्रस्ताव- : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:01 IST

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

ठळक मुद्देस्पाईस पार्क, सौरऊर्जा प्रकल्पही उभारणारया प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूकसांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील

सांगली : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ड्रायपोर्टकरिता आम्ही रांजणी येथील जागेचा प्रस्ताव दिला असून, केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २0 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ व प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

खा. पाटील म्हणाले की, हे एक कोरडे बंदर असणार आहे. फुले, द्राक्षे, डाळिंब, दूध अशा शेती व शेतीपूरक उद्योगातील उत्पादनांना ते उपयोगी ठरणार आहे. येथून थेट निर्यात करण्यासाठी याठिकाणी संबंधित सर्व शासकीय कार्यालयेही थाटली जाणार आहेत. या पोर्टचा फायदा सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यातील शेतकºयांनाही होणार आहे. परदेशातून प्रक्रियेसाठी येणाºया कच्च्या मालासाठीही हे बंदर उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी उद्योगाच्या वाढीस चालना मिळेल.

बंदर झाल्यानंतर याठिकाणी रस्ते, वीज, शीतगृहे, गोदामे यासारख्या सुविधांचा लाभही जिल्ह्याला होणार आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्ह्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.याचठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून निर्माण होणाºया विजेमुळे सिंचन योजनांसमोरील विजेचा प्रश्न निकालात निघेल. अनेकदा सिंचन योजना वीजबिलाअभावी बंद पडतात. सौरऊर्जा प्रकल्पसुद्धा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

स्पाईस पार्क उभारण्याचेही प्रयत्न आहेत. लोणचे व चटण्यांची मोठी बाजारपेठ या माध्यमातून तयार होईल. जिल्ह्यातील अशा उद्योगाला निर्यातीचे दरवाजे खुले होतील, असेही ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे उपस्थित होते.'जागेची उपलब्धता मोठीशासनाच्याच मालकीची रांजणी येथील २ हजार २00 एकर जागा उपलब्ध आहे. याच जागेचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे दिला आहे. प्रकल्पासाठी २ हजार एकर जागा लागेल. या जागेच्या बाजूनेच विजापूर-गुहागर हा राष्टÑीय महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे आपोआप रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागेल. या प्रकल्पाचा विकास आराखडा येत्या आठवड्याभरात निश्चित होणार आहे, असे खा. पाटील म्हणाले.‘टेंभू’साठी ५५0 कोटींची मागणीताकारी व म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच पंतप्रधान सिंचन योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. टेंभूसाठी आणखी ५५0 कोटी रुपयांची मागणी आम्ही केली आहे. नोव्हेंबर २0१९ पर्यंत सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.